बीड: शेतकऱ्यांच्या हितासाठी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी आणि शेतकऱ्यावर आस्मानी संकट येऊ नये म्हणून बीडचा शेतकरी पुत्र श्रीकांत गदळे याने पंढरीच्या विठुरायासाठी चंदन आणि सागवान निर्मित कोरीव अशी पादुकांची वीट तयार केली आहे. श्रीकांत तयार केलेली पादुकांची वीट पंढरीनाथाच्या चरणी अर्पण करणार आहे.
बीडमधील एका शेतकरी पुत्राने आपल्या शेतकरी बांधवांसाठी एक अनोखं साकडे विठुरायाच्या चरणी घातले आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या बंद व्हाव्यात, शेतकऱ्यांवरील आस्मानी संकट आणि शेतकऱ्यांची दुरावस्था दूर व्हावी आणि सदैव विठुरायाचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी राहावा. पुन्हा एकदा बळीच राज्य यावं या उदात्त भावनेतून या शेतकरी पुत्राने विठुरायासाठी चंदन आणि सागवान निर्मित कोरीव अशी पादुकांची एक वीट तयार केली आहे. ही वीट पंढरपूरच्या विठुरायाच्या चरणी अर्पण देखील करणार आहे.
सध्या मराठवाड्यातच नव्हे तर महाराष्ट्रभर अनेक शेतकरी पाऊस नसल्याने दुष्काळी संकटाचा सामना करत आहेत. राज्यात अनेक ठिकाणी पेरण्या रखडल्या आहेत. काही शेतकऱ्यांनी पावसाच्या आशेवर पेरण्या केल्या होत्या त्यांच्यासमोर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. कधी ओला दुष्काळ कधी सुका दुष्काळ कधी अवकाळी तर कधी गारपीटीमुळे शेतकरीवर्ग त्रस्त आहे. आस्मानी संकटांना कंटाळून अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.
Discussion about this post