भारतीय नाट्य आणि नृत्य शास्त्राची मूळ कल्पना या भरतमुनींच्या नाट्यशास्त्रात आहे. नाट्यकला ही जिवंत कला आहे . या कलेतील काही बारकावे समजून घेतले , शिकले तर त्याचा एकूणच आपल्या व्यक्तीमत्त्व विकासात भरीव उपयोग करून घेता येतो .
मुलांयाठी सुट्टीचा पुरेपुर उपयोग म्हणजे हे शिबीर . अतिशय अनुभवी आणि तज्ञ व्यक्ती मुलांना मार्गदर्शन करणार आहेत . त्याच्याकडून अनेक नवनवीन गोष्टी करवून घेणार आहेत .
🌱सततच अभ्यासाच्या ओझ्यामुळे अनेक गोष्टी करायला वेळ मिळत नाही .
🌱 अनेक गुण उपजत असूनही ओळखता येत नाही .
🌱 धाडस नाही
🌱 चार माणसांत बोलायला घाबरतात
अशी आपली तक्रार असते . पण
पुस्तकी शिक्षणाबरोबरच गरज असते ती मनावरील ताण कमी करता येईल अशा कौशल्यपूर्ण कलागुणांची . ज्यात मन, मेंदू आणि शारीर हालचालींचा समावेश होतो . यासाठी अशा शिबीरांची आवश्यकता असते .
शालेय वयात जे अनुभव मुलांना मिळतील ते पुढील जीवनात उपयोगी पडतील .
Discussion about this post