-भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक अदम्य व्यक्तिमत्व भगतसिंग हे अतूट धैर्य, बौद्धिक पराक्रम आणि राष्ट्रहितासाठी अखंड समर्पणाचे प्रतीक म्हणून उभे होते. दडपशाहीविरुद्ध बंडखोरी आणि न्यायाचा पाठपुरावा करणारी त्यांची जीवनकथा पिढ्यांना प्रेरणा देत राहते. भगतसिंग यांनी आपल्या निर्भय कृतीतून आणि विचारप्रवर्तक विचारसरणीद्वारे भारतीय इतिहासावर अमिट छाप सोडत स्वातंत्र्यलढ्याच्या वाटचालीत मोलाची भूमिका बजावली.
तसेच नोकरीविषयक संरक्षण मिळण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून माथाडी ऍक्ट- 1969 हा कायदा व त्या अन्वये माथाडी मंडळाची स्थापना कै. आमदार स्व.अण्णासाहेब पाटील यांनी केली. शहीद भगतसिंग आणि कै. अण्णासाहेब पाटील यांचे कार्य महान आहे. असे प्रतिपादन उपशिक्षण अधिकारी श्री. काकडे यांनी केले.
येथील वसंतराव काळे जर्नालिजम अँड कॉम्प्युटर सायन्स महाविद्यालय बीड तसेच संभाजी राजे लायब्ररी अँड मॅनेजमेंट सायन्स महाविद्यालय बीड यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे शहीद दिन आणि स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला शिक्षक नेते बन्सी हावळे सर, महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य बप्पासाहेब हावळे यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना श्री. काकडे म्हणाले की,वर्षानुवर्षे अन्यायाच्या खाईत तडफडणाऱ्या कष्टकरी कामगारांना मायेचा हात देऊन स्व.आमदार अण्णासाहेब पाटील यांनी कष्टकरी माथाडी कामगारांची ऐतिहासिक चळवळ उभा केली. विविध सोयी सवलती मिळवून देऊन कष्टकरी माथाडी कामगार व त्यांच्या कुटुंबीयांच्या जीवनाला स्थैर्य प्राप्त करून देण्याचे महान कार्य स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांनी केले. तर शहीद भगतसिंग यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी कारशर्य महान असेही ते म्हणाले .
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सुहास गाढवे यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ओंकार देशमुख यांनी केले शेवटी आभार प्रा.भूषण मठपती यांनी मानले.
कार्यक्रमाला प्रा. शैलेश कुलकर्णी ,प्रा.राजश्री महाजन,महेश नेवडे,दीपक जाधव,प्रवीण उंदरे,सचिन चौरे ,सौ.खोसे व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Discussion about this post