पाणीप्रश्नावरून सत्ताधारी राजकारण करत असल्याचा आरोप काल सुप्रिया सुळे यांनी केला होता. या आरोपाला उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, कोण मायचा लाल दौंड, बारामती, इंदापूरचं पाणी आडवतो ते मी पाहते, असं काल कोणीतरी बोलले. अगं पण तिथं पाणीच नाही तर काय पाहते? अरे यांना काही माहिती नाही. आम्ही सगळी कामं करायचो. या राहुल कुल यांना विचारा, किती टीएमसीची धरणे आहेत, किती पाणी पुण्याला प्यायला जाते, किती पाणी शिल्लक राहते? पाणीच शिल्लक नाही तर कोण अडवणार? अगं बाई आम्ही तुला निवडून द्यायचो, उगीच मला बोलायला लावू नका असा इशारा अजित पवारांनी दिला आहे.
मी तर ठरवले आहे या भावकीवर बोलायचंच नाही. त्यांचं त्यांना लखलाभ. असं काही बोललं तर थोडा वेळ लोकांना बरं वाटेल, पण त्यातून लोकांचे प्रश्न सुटणार नाहीत. तुमच्या शेतामध्ये पाणी आणण्यासाठी राज्याचा पैसा आणला पाहिजे, केंद्राचा पैसा आणला.
Discussion about this post