हिंगोली : हिंगोली-नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून तर शंभर ते दीडशे मेंढ्यांचा देखील मृत्यू झाल्याचे माध्यमांनी वृत्त दिले आहे. कळमनुरीजवळ असलेल्या माळेगाव फाटा येथे मेंढ्यांची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात झाला. सकाळच्या सुमारास चालकाला झोप लागल्याने हा अपघात झाल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केले. पोलिसांना स्थानिकांच्या मदतीने जखमी नागरिकांना तातडीने रुग्णालयात दाखल कर्मण्यत आले आहे. रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टारांनी पाच जणांचा मृत घोषित केले. सध्या जखमी झालेल्या मेंढ्यांवर पशुवैद्यकीय रुग्णालयामार्फत उपचार करण्यात येत आहेत.
Discussion about this post