एकंदर राज्यातील हवामानाची स्थिती सातत्यानं बदलत असून, येणारा काळ उष्मा वाढवणारा असेल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे.पुढील 24 तासांसाठी राज्याच्या उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र भागामध्ये उष्णतेची लाट येण्याचा इशारा असून, मराठवाडा आणि विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये एक किंवा दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
सध्याच्या घडीला राज्यात सूर्य आग ओकत असून, महाराष्ट्रातले बहुतांश जिल्हे 40°c च्या पलिकडे पोहोचले आहेत. सोलापूरात तापमान 44°c वर गेलं असून, ठाणे जिल्ह्यात तापमान 42 अंश सेल्सिअस वर गेलं आहे. पुण्यात तापमानाचा आकडा 41.7 अंश सेल्सिअस, मालेगावात 43 अंश तर, संभाजीनगरचा पारा चाळीस अंशाच्याही पलिकडे पोहोचला आहे.
Discussion about this post