“माणसे जोडणे ही केवळ ओळखी वाढविण्याची गोष्ट नाही; तर त्यांच्या सुख-दुःखात उभे राहणे, त्यांच्या क्षमतेवर विश्वास ठेवणे आणि त्यांना पुढे जाण्याची संधी देणे, हीच खरी माणुसकी.” या विचाराला आपल्या कर्तृत्वातून अर्थ देणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे श्री. बन्सी आश्रुबा हावळे सर.
शिक्षक_म्हणून_ज्ञानदान,मुख्याध्यापक_म्हणून_नेतृत्व, शैक्षणिक_क्षेत्रातील_अभ्यासू_योगदान, सामाजिक बांधिलकी आणि रिअल_इस्टेट_क्षेत्रातील_ज्येष्ठ_उद्योजक म्हणून सहकाऱ्यांना संधी—अशा विविध पैलूंनी समृद्ध असलेला त्यांचा जीवनप्रवास खऱ्या अर्थाने बहुआयामी आहे.
मूर्शदपूर घाटच्या मातीतून सुरू झालेला त्यांचा प्रवास संघर्ष, शिक्षण आणि कर्तृत्वाच्या बळावर घडत गेला. बी.एस्सी. गणित, एम.एस्सी., बी.एड., पत्रकारिता आणि मुख्याध्यापक व्यवस्थापन पदविका अशा विविध शैक्षणिक पात्रता संपादन करताना त्यांनी सतत शिकत राहण्याची वृत्ती जपली. बी.एस्सी.च्या तृतीय वर्षात असतानाच त्यांनी गणित-विज्ञानाचे विनामूल्य शिकवणी वर्ग सुरू करून ज्ञानदानाची सुरुवात केली. दि. १ जुलै १९९२ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय, बीड येथे शिक्षक म्हणून रुजू झाल्यानंतरची त्यांची ३५ वर्षांची शैक्षणिक वाटचाल अनेक पिढ्यांना घडविणारी ठरली.
गणित विषय शिकवताना त्यांनी विद्यार्थ्यांना केवळ उदाहरणे सोडवायला शिकविले नाही, तर विचार करायला, प्रश्न विचारायला आणि स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवायला शिकविले. नवोदय, शिष्यवृत्ती, प्रावीण्य, प्रश्नमंजुषा, विज्ञान प्रदर्शन अशा विविध उपक्रमांतून विद्यार्थ्यांच्या क्षमतांना वाव दिला. त्यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांनी जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर यश संपादन केले. सन २०१३ मध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखालील विद्यार्थी पोपट मोरे यांची राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेसाठी निवड होणे हा त्यांच्या प्रयोगशील शिक्षकपणाचा विशेष गौरव ठरला.
हावळे सरांचे योगदान केवळ वर्गखोलीपुरते मर्यादित राहिले नाही. गणित अध्यापक महामंडळ, शासकीय शिष्यवृत्ती मंडळ, मराठवाडा शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, भाजपा शिक्षक आघाडी आणि बीड जिल्हा मुख्याध्यापक संघ अशा विविध शैक्षणिक व शिक्षक संघटनांच्या माध्यमातून त्यांनी व्यापक काम केले. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसोबतच शिक्षकांच्या प्रश्नांवर, शैक्षणिक विकासावर आणि संघटनात्मक कार्यावरही त्यांनी सक्रिय भूमिका बजावली.
अध्यापनातील त्यांचा अनुभव लेखनातूनही व्यक्त झाला. इयत्ता सहावी ते दहावीच्या गणित विषयाच्या पुस्तिकांच्या लेखनात तसेच इयत्ता आठवी शिष्यवृत्ती पुस्तिकेच्या लेखनात त्यांनी योगदान दिले. त्यामुळे त्यांचे कार्य केवळ स्वतःच्या वर्गातील विद्यार्थ्यांपुरते न राहता व्यापक विद्यार्थीवर्गापर्यंत पोहोचले. शिक्षक म्हणून मिळविलेले ज्ञान इतर विद्यार्थ्यांच्या उपयोगी पडावे, ही त्यामागची भूमिका होती. अशा प्रकारे त्यांनी वर्गात अध्यापन केले, लेखनातून ज्ञान पोहोचविले आणि शिक्षक संघटनांच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात योगदान दिले.
याच काळात सामाजिक बांधिलकीही त्यांनी जपली. गरजू विद्यार्थी, शेतकरी, शेतमजूर, ऊसतोड कामगार आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यामुळे हावळे सर हे केवळ शिक्षक न राहता अनेकांसाठी मार्गदर्शक आणि विश्वासाचा आधार बनले.
दि. १ जुलै २०२१ रोजी मुख्याध्यापकपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी नेतृत्वाची नवी भूमिका समर्थपणे निभावली. “शिक्षण हे केवळ गुण मिळवण्यासाठी नाही, तर माणूस घडवण्यासाठी आहे,” हा विचार त्यांच्या कार्याचा केंद्रबिंदू राहिला. विशेष म्हणजे, सेवाकाळ पूर्ण होण्यास सुमारे अडीच वर्षे बाकी असतानाच त्यांनी स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय स्वीकारला. हा निर्णय केवळ सेवेतून दूर जाण्याचा नाही; तर आपल्या अनुभवाचा उपयोग शैक्षणिक आणि रिअल इस्टेट उद्योजकीय क्षेत्रात अधिक व्यापकपणे करण्याच्या नव्या पर्वाची सुरुवातच आहे.
त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा दुसरा महत्त्वपूर्ण पैलू म्हणजे रिअल इस्टेट क्षेत्रातील त्यांची उद्योजकीय वाटचाल. सन २००८ पासून बीडमध्ये आपल्या विश्वासातील सुमारे १०–१२ सहकाऱ्यांना सोबत घेऊन त्यांनी प्लॉटिंगच्या माध्यमातून सामूहिक गुंतवणुकीची वाटचाल सुरू केली. स्वतःच्या फायद्याबरोबरच सोबतच्या प्रत्येक सहकाऱ्यालाही लाभ मिळावा, हा त्यांच्या विचाराचा गाभा होता. त्यामुळे व्यवहारांपेक्षा विश्वासाचे नाते अधिक मजबूत झाले. पुढे संभाजीनगरजवळील बाळापूर परिसरात मोठ्या प्रमाणावर प्लॉटिंग विकसित करून विक्रीचे काम त्यांनी उभे केले. आज पुण्याच्या नेरे-हिंजवडी परिसरात सुरू असलेल्या व्हिक्टो इन्फ्रा च्या प्रकल्पातही त्यांनी मोठी गुंतवणूक करून सहकाऱ्यांना सोबत घेतले आहे. या क्षेत्रातील त्यांच्या अनुभवाचा आणि मार्गदर्शनाचा लाभ सहकार्याना सातत्याने मिळत आला आहे.
शिक्षणातून त्यांनी माणसे घडवली, संघटनात्मक कार्यातून माणसे जोडली, सामाजिक कार्यातून त्यांच्याशी नाते जपले आणि रिअल इस्टेटमधून त्या जोडलेल्या माणसांना सामूहिक प्रगतीची संधी उपलब्ध करून दिली. म्हणूनच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा गाभा एका वाक्यात सांगायचा झाला तर—“स्वतः पुढे जाण्यापेक्षा, आपल्या सोबतच्या माणसांनाही पुढे घेऊन जाणे” हीच त्यांच्या जीवनाची कार्यपद्धती आहे.
“एकट्याने मोठे होण्यात यश असते; पण आपल्यासोबतच्या माणसांना मोठे करण्यात नेतृत्व असते.” हावळे सरांच्या जीवनप्रवासाचे हेच सार म्हणावे लागेल. ३१ जुलै २०२६ रोजी ३५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून त्यांनी निवृत्ती स्वीकारली असली, तरी त्यांचा प्रवास थांबलेला नाही. शिक्षणाचा अनुभव, शैक्षणिक लेखनाची समृद्धी, शिक्षक संघटनांतील कार्याचा व्यापक अनुभव, सामाजिक बांधिलकी आणि रिअल इस्टेट उद्योजकीय क्षेत्रातील दूरदृष्टी यांची शिदोरी घेऊन ते आता नव्या पर्वात प्रवेश करत आहेत.
पदावरून_निवृत्ती_झाली_असली,तरी_माणसांच्या_मनातून_आणि_कार्यातून_निवृत्ती_नसते. ज्ञानसेवेचा हा गौरवशाली प्रवास आणि नव्या पर्वाची सुरुवात साजरी करण्यासाठी आयोजित सेवापूर्ती_गौरव_सोहळ्याला_आपण_सर्वांनी_मोठ्या_संख्येने_उपस्थित_राहून_कार्यक्रमाची_शोभा_वाढवावी, ही नम्र विनंती!”
ज्ञान देणारे शिक्षक, शैक्षणिक क्षेत्राला दिशा देणारे मार्गदर्शक, माणसांचा विश्वास जपणारे सहकारी आणि रिअल इस्टेटमधून संधी निर्माण करणारे ज्येष्ठ उद्योजक—श्री. बन्सी आश्रुबा हावळे सर यांच्या बहुआयामी कर्तृत्वाला मनःपूर्वक सलाम!
आणि त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!
संपादक
प्रा गणेश पोकळे
