भाजपच्या निवडणूक जाहीरनाम्यावर म्हणाल्या, भ्रष्टाचार आणि घराणेशाहीवर भारतीय जनता पक्ष गप्पा मारीत आहे; परंतु, जितका मोठा भ्रष्टाचारी तितका मोठा त्याचा भाजपमध्ये प्रवेश होतो,’ अशी टीका शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली.‘यापूर्वी केलेल्या घोषणांचे काय झाले? किती आश्वासनांची पूर्तता केली? याचे उत्तर भाजपने द्यावे.
दोन कोटी रोजगारनिर्मितीचे काय झाले? इंदू मिल स्मारकाचे काय झाले? महागाई कमी करण्याच्या आश्वासनाचे काय झाले? याची उत्तरे द्यावीत.
त्यानंतर त्यांनी नव्या संकल्प पत्रावर बोलावे. आश्वासने देऊन ती न पाळणे ही भाजपची पद्धत झाली आहे. त्यांच्या प्रचाराला मतदार भूलणार नाहीत. घराणेशाहीवर बोलण्यापूर्वी त्यांनी दिलेले उमेदवार पाहिले पाहिजेत.’
Discussion about this post