मुंबई-आग्रा महामार्गावर एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात हा अपघात झाला आहे. एसटी बस आणि ट्रक यांच्यात जोरदार धडक झाली.
हा अपघात इतका भीषण होता की, चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अनेक प्रवासी हे जखमी झाले आहेत. या अपघातात मृतकांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी स्थानिक ग्रामस्थ, पोलीस दाखल झाले आणि मदत-बचावकार्य सुरू झाले. अपघातात जखमी असलेल्या प्रवाशांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या अपघातात चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांवर चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Discussion about this post